भाजप-राष्ट्रवादीचे सरकार २ वर्षांपूर्वी बनले असते, पण… फडणवीसांचा धक्कादायक खुलासा

मुंबई |  भाजप-राष्ट्रवादीचे सरकार २ वर्षांपूर्वी बनले असते असा धक्कादायक खुलासा माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रात जे राजकीय नाट्य घडलं याविषयी त्यांनी ‘द इनसायडर’ला सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दोन वर्षांपर्वी अशी स्थिती आली होती की भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र यायचं असा निर्णय त्यावेळी झाला. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितलं की काँग्रेसला आयसोलेट करा… राष्ट्रवादी आणि भाजप सोबत यायचं असेल तर शिवसेनेला देखील सोबत घ्यावं लागेल. शिवसेनेशिवाय नाही… पंतप्रधान मोदींनी त्यावेळी इतकं स्पष्टपणे सांगितलं होतं…”

“पंतप्रधान मोदींचा निरोप थेट अमित शहांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितला. जर एकत्र यायचं असेल आणि काँग्रेसला आयसोलेट करायचं असेल तर शिवसेना सोबत लागेल. शिवसेनेशिवास आम्ही तुम्हाला घेत नाही…. त्यावेळी पूर्णपणे राष्ट्रवादी आमच्यासोबत यायला तयार होती. पण नंतर ते शक्य झालं नाही.”

शिवसेनेविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले-

शिवसेनेने आमच्याशी असलेली युती तोडली याचा मला राग आला. त्याची दोन कारणे होती. लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेचे उमेदवार जसे काही भाजपचे उमेदवार आहेत अशा पद्धतीने मी त्यांचं काम केलं. त्यांचा प्रचार केला. माझ्या पद्धतीने मला जेवढं शक्य आहे ते ते मी सगळं केलं. कारण मोदींजींना पंतप्रधान करायचं होतं.”

“विधानसभेच्या निवडणुकीवेळी देखील ज्या दिवशी फॉर्म माघारी घ्यायचे होते, त्यावेळी भाजपच्या बंडखोरांचे फ़ॉर्म माघारी घ्यायला बसलो. त्यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई आणि इतर मान्यवर माझ्याकडे आली होती. तेव्हा सकाळपासून सुमारे 5 तास मी फोनवर होतो. आमच्या बंडखोरांना मी फॉर्म परत घ्यायला सांगितले.”

“आमच्या जवळपास बऱ्याच लोकांनी माझ्या सूचनेचं पालन करत फॉर्म परत घेतले. त्याच वेळी आमच्याविरोधात सेनेचे बंडखोर तयार होतातयेतहे मात्र मी पाहिलं नाही. त्यावेळी मी अशी अट नाही टाकली की तुमच्या या उमेदवाराने माघार घेतली तर आमचा हा उमेदवार फॉर्म मागे घेईन. शिवसेनेने त्यावेळी प्रचंड बंडखोरी केली त्यामानाने भाजपची कमी होती. कारण मी जवळजवळ सगळे बंडखोर परत घेतले होते.”

“निवडणुकीत देखील मी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केलाच केला… पण शिवसेनेच्या उमेदवारांचा देखील प्रचार केला मात्र उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला.  माझे शिवसेनेशी जुने संबंध होते. अनेक जण खूप जवळचे होते.  शिवसेनेचे अनेक उमेदवार मला फोन करून त्यांच्या अडचणी सांगायचे. मग मी देखील आपला उमेदवार आहे म्हणून त्यांच्या अडचणी दूर करायचो. ”

“मी मुख्यमंत्री असताना उद्धवजींनी मला काही गोष्टी सांगितल्या अन् मी त्या ऐकल्या नाही असं कधीच घडलं नाही. उद्धवजी देखील हे मान्य करतील. त्यामुळे साहजिकच मला सात्विक संताप आला. राग आला. पण शेवटी राजकारण आहे…. अशा गोष्टी मागे टाकायच्या असतात आणि पुढे जायचं असतं… ”

महत्वाच्या बातम्या-

-गूड न्यूज… पूर्व लडाखमधून चीन सैन्य मागे घेण्यास तयार!

-एवढ्या जागा जिंकूनही मी मुख्यमंत्री झालो नाही याचं वाईट वाटलं- फडणवीस

-हजारो भारतीयांना आता नोकरीसाठी अमेरिकेची दारं बंद कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला हा निर्णय!

-विश्वासघात केल्यामुळे शिवसेनेविषयी संताप आला; फडणवीसांनी सांगितली ‘ही’ २ कारणं!

-माझ्या नादी लागू नको नाहीतर तो व्हिडीओ… सोनू निगमची फिल्म इंडस्ट्रीतल्या या बड्या आसामीला धमकी