हिम्मत असेल तर भाजपने आमचं सरकार पाडून दाखवावं- उद्धव ठाकरे

मुक्ताईनगर |  एप्रिल-मे मध्ये कशाला तुमच्यात जर हिम्मत असेल तर उद्या किंवा आताच सरकार पाडून दाखवा, असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलं आहे. ते मुक्ताईनगरमध्ये बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

ऑपरेशन लोटस कसलं करता… तुम्हालाच लोटलं ना लोकांनी, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी ऑपरेशन लोटसची खिल्लीही उडवली. तीन चाकाच्या रिक्षाचं हे सरकार आहे. या रिक्षाची तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेला आहेत. त्यामुळे लवकरच हे सरकार पडेल, अशी टीका विरोधक सातत्याने करत आहेत. विरोधकांच्या याच टीकेला मुख्यमंत्र्यांनी आज उत्तर दिलं.

मुक्ताईनगरमध्ये सभा होती त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्री एकनाथ खडसेंवर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मुक्ताईनगर मुक्त झालं आहे कुणापासून ते तुम्हाला चांगलंच माहित आहे. तुम्हीच त्यांना बाजूला केलं आहे, अशी कोपरखळी उद्धव ठाकरेंनी मारली अन् उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.

दुसरीकडे ठाकरे सरकार लवकरच पडेल, असं भाजप म्हणत असताना प्रकाश आंबेडकर यांनीही त्यामध्ये भर टाकत सरकारचं भविष्य येत्या 1 एप्रिलला ठरेल, असं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-पोरींना ‘लव्ह मॅरेज’ करू नका अशी नाही… तर चांगला ‘बॉयफ्रेंड’ निवडा अशी शपथ द्या- इंदुरीकर महाराज

-संभाजीराजेंच्या समाधीवर माथा टेकवताच अमोल कोल्हेंना अश्रू अनावर! म्हणाले…

-ठाकरे सरकारच्या कारभाराविरोधात आंदोलन उभं करणार- विनोद तावडे

-काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेनेतल्या मतभेदांमुळेच सरकार कोसळेल; खडसेंची भविष्यवाणी

-भाजप सरकारने केलेल्या चुका महाविकास आघाडीला दुरूस्त कराव्या लागतील- शरद पवार