मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द केल्या जाव्यात अशी मागणी करणारं पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लिहिलं आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टहास कशासाठी आणि कोणासाठी ? अशी विचारणा राज ठाकरे यांनी पत्रात केली आहे.
मोठ्या संख्येने या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर काढून त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आरोग्य धोक्यात घालण्यामागचं प्रयोजन काय?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन आणि ही अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षा रद्द कराव्या आणि यामध्ये कोणत्याही राजकारणाला तुम्ही थारा देऊ नये, अशी विनंती राज ठाकरे यांनी राज्यपालांना केली आहे.
बई आणि पुणे परिसरातील परिस्थिती पाहता हा भाग अजून किती काळ टाळेबंदीत राहील याचं भाकीत कोणीच करु शकत नाही. बरं जर लॉकडाउन शिथील झाला तरी याचा अर्थ करोना संपला असा होत नाही हे आपणदेखील जाणता. अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टहास कशासाठी आणि कोणासाठी ?, अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली आहे.
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याविषयी महाराष्ट्राच्या सन्मानीय राज्यपालांना पत्र.#लढाकोरोनाशी #विद्यार्थ्यांचामनसेआवाज #महाराष्ट्र #UniversityExams #FinalYearExam #MaharashtraFightsCorona@maha_governor pic.twitter.com/iIjLYgF0la
— Raj Thackeray (@RajThackeray) May 26, 2020
महत्वाच्या बातम्या-
-महाराष्ट्रात आमचा सरकारला पाठिंबा, पण…- राहुल गांधी
-चार वाजता काय होणार? फडणवीसांच्या ‘या’ कृतीकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष!
-“पॅकेजची रिकामी खोकी व विरोधकांची रिकामी डोकी, एकदा गुजरातची अंधारकोठडी बघायला जा”
-‘कठोर निर्णय, धडक अंमलबजावणी’, नागपुरात कोरोना नियंत्रणाचा तुकाराम मुंढे पॅटर्न!
-“विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच निर्णय घेतला जाईल”