परप्रांतीय कामगारांना परत आणण्याची जबाबदारी उद्योजकांनी घ्यावी- नितीन गडकरी

नागपूर | परप्रांतीय कामगारांवर महाराष्ट्रातील उद्योग अवलंबून असल्याचं निर्माण केल जात असलेलं चित्र खरं नाही. असे कामगार केवळ 10 ते 12 टक्के आहेत. कामगारांना परत आणण्याची जबाबदारी उद्योजकांना घ्यावी लागेल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गडकरींनी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. यावेळी ते बोलत होते.

कोरोनामुळे सर्वच उद्योग, व्यवसायांवर व अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक देशात आणणे, आपले तंत्रज्ञान अधिक अद्ययावत करणे आणि जनतेची क्रयशक्ती वाढवणे हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरच्या पदाधिकाऱ्यांनी या दृष्टीने विचार करावा. उद्योजकांनी उद्योग हळूहळू सुरू करावेत, असं गडकरी म्हणाले आहेत.

आम्हाला कोरोनासारख्या आपत्तीचं रूपांतर इष्टापत्तीत करायचं आहे. त्यामुळे निराश होऊन चालणार नाही. कोरोना संकट आणि आर्थिक लढाई एकाच वेळी लढायची आहे. जोपर्यंत करोनावर औषध निघत नाही, तोपर्यंत कोरोनाचा प्रसार होणार नाही, या पद्धतीने नियम पाळून कामाला लागावे लागेल, असं नितीन गडकरी म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

-सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक, पण कारभारावर सडकून टीका!

-“अमोल कोल्हेसारख्या व्यक्तीला जो मनस्ताप दिला तो कधीही भरुन निघणार नाही”

-“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातलं सक्षम नेतृत्व, त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत”

-‘मी वरिष्ठ मंत्र्याच्या कामात लुडबुड करत नाही’; कॉल करणाऱ्या शेतकऱ्याला अजित पवारांचं उत्तर

-अक्षय बोऱ्हाडे-शेरकर वादाच्या कलाटणीनंतर मिटकरींची गरमागरम फेसबुक पोस्ट!