एकतर हे माध्यम सोडून द्यावं नाहीतर….; जितेंद्र जोशींना संताप अनावर

मुंबई | सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत सहज व्यक्त होण्यासाठी सर्रास वापरलं जाणारं माध्यम म्हणजे सोशल मीडिया. मात्र त्यासोबत ट्रोलिंगचंही प्रमाण खूप वाढलं आहे. या ट्रोलिंगवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एक ट्विट केलं या ट्विटला प्रतिसाद देताना जितेंद्र जोशीने संताप व्यक्त केला आहे.

ट्वीटरकरांनी आता कुठल्याही कलाकारांनी त्यांची मते, अभिप्राय, भावना, इ. समाज माध्यमांवर व्यक्त करावी अशी अपेक्षा करणं थांबवावं. कारण त्या मतांचं आदर करणं आपल्याला जमणार नाहीच. कलाकार व्यक्त होत नाही म्हणून आणि मग व्यक्त झाले तरीही #trolling हे सुरूच राहतं, असं सोनालीने ट्विट करत म्हटलं. या ट्विटला जितेंद्र जोशीने अतिशय परखड अशा शब्दात आपली भूमिका मांडत आपला संंताप व्यक्त केला आहे.

मतांचा आदर करणं फार पूर्वीच थांबलं. जिथे आज माणसं थोरामोठ्यांना , महापुरुषांना सोडत नाहीत, लतादीदी ना ट्रोल करतात तिथे सर्वसामान्य कलाकाराची काय बिशाद!! असो.. एकतर हे माध्यम सोडून द्यावं अन्यथा ट्रोलिंग ला भीक न घालता व्यक्त होत रहावं, असं जितेंद्र जोशीने म्हटलं आहे.

दरम्यान, आजवर अनेक कलाकारांना सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा सामना करावा लागला. फोटो, व्हिडीओ किंवा एखाद्या विषयावरून मांडलेलं मत यावरून अनेक कलाकार ट्रोलिंगचे शिकार झाले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

-उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस नेतेही पोहोचले आयोध्येत

-पोरीनं आई-बापाचं पांग फेडलं; पहिल्याच प्रयत्नात बनली पीएसआय!

-सरकाचा अर्थसंकल्प महिला वर्गाला पूर्णपणे निराशा करणारा; चित्रा वाघ यांची टीका

-राहुल गांधींनी कोरोनाची तपासणी केली; काँग्रेसचं भाजपला उत्तर

-मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो हे सरकार पाच वर्ष टिकणार म्हणजे टिकणार- अजित पवार