मोदी सरकार 80 कोटी लोकांना 2 रूपये किलोने गहू आणि 3 रूपये किलोने तांदूळ देणार

नवी दिल्ली | देशावर सध्या कोरोनाच्या रूपाने आपत्तीजनक परिस्थितीत ओढावली आहे. अशा परिस्थितीत देशातल्या 80 कोटी लोकांना स्वस्त दराने गहू आणि तांदूळ देण्याचा दिलासादायक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. (Modi Goverment will Give 2 rs kg Wheat And 3 rs kg Rice For 80 crore indian)

केंद्र सरकार 27 रूपये किलोचा गहू 2 रूपये तर 37 रूपये किलो दराचा तांदूळ 3 रूपये किलोने देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असल्याची माहिती केंद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. (Modi Goverment will Give 2 rs kg Wheat And 3 rs kg Rice For 80 crore indian) तसंच सरकारी क्षेत्रांमध्ये जे कंत्राटी कामगार आहेत त्यांनाही सरकार पगार देईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

करोनाशी लढण्यासाठी तीन ते चारच उपाय आहेत. घरातच थांबा, काहीही काम केलं की हात धुवा, ताप, सर्दी, खोकला वाढला तर लगेच डॉक्टरांकडे जा. तसंच सोशल डिस्टसिंग हे मोजकेच उपाय आहेत, असं जावडेकर म्हणाले.

दरम्यान, केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णायामुळे हातावर पोट असणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. गरज पडली तर आणखी काही निर्णय केंद्र सरकार घेईल, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

-महाभारताचं युद्ध 18 दिवसांत जिंकलं, कोरोनाचं युद्ध 21 दिवसांत जिंकायचंय- नरेंद्र मोदी

-प्लीज पप्पा… बाहेर जाऊ नका बाहेर कोरोना आहे; लहानग्या चिमुकल्याची पोलिस बापाला आर्त साद

-बाहेरच्या लोकांनी गावात प्रवेश करु नये म्हणून गावकऱ्यांची नामी शक्कल

-देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन; सर्व रेल्वे गाड्याही 14 एप्रिलपर्यंत रद्द

-मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार सुरूच; मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांना पोलिसांनी पकडलं