मलायकाशी लग्न करण्यास अर्जुन का करतोय टाळाटाळ?

मुंबई | अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा या दोघांच्या नात्याविषयी चर्चा धुमाकूळ घालत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मलायकाने तिचं ड्रिम वेडिंग कसं असेल याच्या काही कल्पना शेअर केल्या आहे. त्यामुळे अर्जुन आणि मलायका लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र एका मुलाखतीमध्ये अर्जुननं आत्ता मलायकाशी लग्न करणार नसल्याचं सांगितलं आहे.

सध्या लग्न करण्याचा कोणताही विचार नाही, असं अर्जुनने मुलाखती दरम्यान सांगितलं. गुपचूप लग्न करणार नाही, सांगूनच करेल, असंही त्यानं म्हटलं आहे.

लग्न हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय आहे, त्यामुळे हा निर्णय मी गडबडीत घेऊ शकत नाही, असं अर्जुनने सांगितलं. बरोबर वेळ आल्यावर मी हा निर्णय घेईल आणि सर्वांना लग्नाला बोलवेल. माझं कुटुंब मोठ्या लग्नासोहळ्यावर विश्वास ठेवत आणि माझं लग्नही त्याच स्वरुपात होईल, असंही अर्जुन म्हणाला आहे.

यापूर्वीही अर्जुन आणि मलायकाला लग्नाबद्दल विचारलं गेलं होतं आणि त्यांनी हा विषय टाळला होता. आत्ता तरी ते दोघे एकमेकांना वेळ देत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

♥️

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

महत्वाच्या बातम्या – 

-“काँग्रेसनं अरविंद केजरीवाल यांचं नेतृत्व स्वीकारावं”

-भाजपच्या अडचणी आता वाढणार कारण अरविंद केजरीवाल उचलणार ‘हे’ पाऊल

-लोकसंख्या नियंत्रणसाठी शिवसेनेचा पुढाकार; राज्यसभेत केलं विधेयक सादर

-“दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर भाजपचा बुडबुडा फुटला”

-वाड्या वस्त्यांची जातीवाचक नावे होणार हद्दपार?; ठाकरे सरकारचे संकेत