पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधणार, काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 जूनला देशाला संबोधित करणार आहेत. एकीकडे भारतात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. तर दुसरीकडे भारत-चीनमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दोन्ही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी नक्की काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

केंद्र सरकारकडून अनलॉक-2 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत कंटेनमेंट झोन वगळता इतर गोष्टींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय, रेड झोनमधले निर्बंध येत्या 31 जुलैपर्यंत कायम राहणार आहेत.

येत्या 1 जुलैपासून अनलॉक-2 चे नियम लागू होतील. टप्प्या-टप्प्याने देशात अनलॉकची प्रक्रिया राबवली जाईल, असं यात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, भारत-चीन सीमारेषा भागात तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनच्या 59 अ‍ॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भारताचा चीनला हिसका, टिकटॉकसह 59 अ‌ॅपवर बंदी

-जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार, आरोग्यमंत्र्यांचा दावा

-कोरोनाचा धोका टाळण्यासाठी….., मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कडक सूचना

-जगातला सगळ्यात मोठा प्लाझ्मा ट्रायल प्रोजेक्ट, उद्धव ठाकरेंनी केली घोषणा

-“चीनच्या पंतप्रधानांना मोदी 19 वेळा भेटले, काय निष्पन्न झालं?”