CAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका

मुंबई |  शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा(सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी(एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या सुची(एनपीआर) या मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, यावरुन महाविकास आघाडीत धुसफूस निर्माण झाल्याचं दिसत आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा हा फार गहन विषय आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी याचं जाहीरपणे तरी समर्थन करु नये. या कायद्याबाबत उद्धव ठाकरेंना कोणी तरी समजवावे लागेल, संधी दिली तर मी समजावून सांगतो, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

शिवसेनेच्या सीएए समर्थनाला काँग्रेसने विरोध केला आहे. सीएएला आम्ही विरोध करत असून राष्ट्रपातळीवर आमच्या पक्षाची जी भूमिका आहे, तीच राज्यात असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील विसंगती दिसून येत आहे.

दरम्यान, नागरिकत्व कायद्याला घाबरण्यासारखे काही नाही, शिवसेना या कायद्याला समर्थन करते, असं उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

इंदुरीकरांच्या वक्तव्याने आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे संकेत

-बरळणाऱ्या वारिस पठाणांच्या मदतीला धावले इम्तियाज जलील; म्हणाले…

-नीरेचं पाणी पेटलं… बारामतीला पाणी वळवल्याच्या निषेधार्थ आज फलटण बंद

-“15 कोटी मुसलमान जर तुमच्या विचारांचे असते तर तुमच्यावर माजी आमदार होण्याची वेळ आली नसती”

-बाळासाहेब असते तर ते काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेले असते का?? सुभाष देसाईंचं लक्षवेधी उत्तर