“शिवसेनेच्या वाघाची आता शेळी झाली आहे”

औरंगाबाद | राज्यातील शिवसेनेचं सरकार फारकाळ टीकणार नाही. शिवसेना दडपणाखाली काम करत आहे. तसेच शिवसेनेच्या वाघाची आता शेळी झाली आहे, असा टोला भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक सोमवारी होत असून भाजपच्या ताब्यात लातूरची जिल्हा परिषद राहिल. सरकार बदललं म्हणून त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणावर होणार नाही, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ते लातूरमध्ये आयोजित सभेत बोलत होते.

नुकतंच लातूर महानगरपालिकेत भाजपला फटका बसला आहे. लातूर महानगरपालिका पूर्वी भाजपच्या ताब्यात असताना काँग्रेसने भाजपचे काही नगरसेवक फोडून सत्ता काबीज केलेली आहे.

दरम्यान, लातूर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असून पुन्हा महानगरपालिकेसारखी परिस्थिती येऊ नये यासाठी संपूर्ण भाजपचे पदाधिकारी खबरदारी घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या-