मुंबई | गावी निघालेल्या मजुरांना औरंगाबादजवळ एका ट्रेनने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. औरंगाबादच्या घटनेनं माझं मन सुन्न झालंय, अशी भावनिक प्रतिक्रिया रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
औरंगाबादजवळ मालवाहू रेल्वेखाली चिरडून जालना इथल्या स्टील कंपनीत काम करणाऱ्या १५ ते १६ परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी सुन्न करणारी आहे, असं म्हणत त्यांनी मृत मजुरांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
कामगारांची गावाकडे जाण्याची सोय केली जात असताना त्यांनी जीव धोक्यात घालून प्रवास करु नये, असं आवाहन देखील रोहित पवार यांनी सर्व स्थलांतरित कामगारांना केलं आहे.
दरम्यान, औरंगाबाद जवळच्या बदनापूर-करमाड दरम्यान हा रेल्वे अपघात झाल्याची प्राथमिक आहे. या अपघातात 14 मजूर मृत्यूमुखी पडले आहेत 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर औरंगाबादच्या शासकीय इस्पितळात उपचार सुरू आहेत.
औरंगाबादजवळ मालवाहू रेल्वेखाली चिरडून जालना इथल्या स्टील कंपनीत काम करणाऱ्या १५ ते १६ परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी सुन्न करणारी आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली.कामगारांची गावाकडे जाण्याची सोय केली जात असताना त्यांनी जीव धोक्यात घालून प्रवास करू नये, असं मी आवाहन करतो.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 8, 2020
महत्वाच्या बातम्या-
-औरंगाबादजवळ काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; मालगाडीने 16 मजुरांना जागीच चिरडलं
-खडसे, बावनकुळे, पंकजा मुंडें यांना भाजपचा पुन्हा दे धक्का; विधानपरिषदेची उमेदवारी नाही?
-आता दारु प्रेमींना मिळणार घरपोच दारु; झोमॅटो देणार होम डिलिव्हरी
-सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्या ‘या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी
-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यक्षमतेवरच देवेंद्र फडणवीस यांचं प्रश्नचिन्ह