नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्चर्यकारकरित्या सोशल मीडियाला बायबाय करण्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतर त्यावर विविध स्तरातले लोक व्यक्त व्यक्त होऊ लागले आहेत. कुणी ट्वीटरवरून आपलं मतं मांडतंय तर कुणी माध्यमांसमोर येऊन मोदींबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करतंय. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया सोडू नये, असं आवाहन करताना त्यांनी जर सोशल मीडियाला रामराम ठोकला तर त्यांचे करोडो फॅन्स अनाथ होतील, असा मिश्किल टोला लगावला आहे.
नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाला रामराम ठोकून त्यांच्या करोडो फॅन्सना अनाथ करू नये. असं करणं चांगलं नाहीये.मोदींचे करोडो फॅन्स म्हणजे त्यांचे सायबर योद्धा आहेत. सेनापतींच्या आदेशावर योद्धे काम करत असतात. आणि सेनापतीच जर सोशल मीडियाचं मैदान सोडत असतील तर त्यांची फौज काय करणार? अशी खोचक प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.
सोशल मीडियाचा गैरवापर दिवसेंदिवस वाढताना दिसून येत असल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलं. लोकांना भ्रमित करण्यासाठी, खोटं पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होत असल्याची चिंता राऊत यांनी व्यक्त केली.
दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी घेतलेला निर्णय राष्ट्रहिताचा आहे आम्ही त्याचं स्वागत करतो, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी मोदींची फिरकी घेत सोशल मिडिया बंद करायला आठ दिवसांचा वेळ घेतलाय पण नोटबंदी मात्र क्षणात केली होती. म्हणजेच न विचार करता घेतलेले निर्णय किती घातक असतात याची कल्पना आल्यामुळे त्यांनी आठ दिवसांचा वेळ घेतला असेल का??, असं म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
-“पवारांच्या धसक्यामुळे तर मोदींनी सोशल मीडिया सोडण्याचा विचार केला नसेल ना??”
-“जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मोदी…. अन् मोदी आहेत तोपर्यंत मी!”
-…म्हणून मोदींनी सोशल मीडिया बंद करायला 8 दिवसांचा वेळ घेतला असेल- जितेंद्र आव्हाड
-मोदी भक्तांनो, तुम्ही सगळ्यांनीच सोशल मीडिया सोडला तर देश शांत होईल- नवाब मलिक
-मुस्लिम आरक्षणावर विश्व हिंदू परिषदेने डोळे वटारताच सेनेचा वाघ शांत!