आम्ही 100 असलो तरी त्यांना पुरून उरतोय- सुप्रिया सुळे

रायगड | केंद्र सरकारमध्ये भाजपचे 303 खासदार आहेत. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत त्यांचे खासदार निवडून आलेले आहेत. मात्र आमचे महाआघाडीचे केवळ 100 खासदार केंद्रात आहेत. मात्र आम्ही सर्व भाजपला पुरून उरत आहोत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

माणगांव येथे महिला दिनानिमित्त दक्षिण रायगड महिला मेळाव्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी पालक मंत्री आदिती तटकरे याही उपस्थित होत्या. दिल्ली संसदेत गेले दहा दिवस अधिवेशन सुरु आहे. पण या काळात काहीही काम झालेलं नाही, असं सुळे यावेळी म्हणाल्या आहेत.

दिल्लीत झालेल्या दंगलीप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर द्यावे अशी मागणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली. मात्र, अमित शहा उत्तर द्यायला तयार नाहीत. आम्हाला उत्तर देणं त्यांना जड जात आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, दिल्लीतील दंगलीप्रकरणी संसदेत गदारोळ सुरु आहे. विरोधकांनी यावरुन भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“जर एखादी जादू झाली आणि संघ परिवारातील सर्व स्वयंसेवक गायब झाले, तर…”

-आता नोटा तर सोडाच पण बॅंका बंद व्हायची भीती वाटतीय- संजय राऊत

-तुम्ही देखील घायाळ व्हाल दीपिकाचा बीचवरील हॉट अंदाज पाहून

-“डॉ आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे, असं मी म्हणालोच नाही”

-मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी 45 कोटी पण राम मंदिराला फक्त 1 कोटी???- निलेश राणे