मुंबई | अवघ्या जगाचं लक्ष्य लागून राहिलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकात भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 85 धावांनी मात करत पुन्हा एकदा विश्वचषक आपल्या नावावर केला आहे.
टीम इंडियाच्या पराभवानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केलं आहे.
भारतीय महिला संघाला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला असला तरी या स्पर्धेतील त्यांची कामगिरी अविश्वसनीय होती, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम खेळ केला आणि टीम इंडियाचे भविष्य उज्वल आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ऑस्ट्रेलियन महिला संघाचे अभिनंदन. मोक्याच्या सामन्यात त्यांनी त्यांची कामगिरी उंचावली आणि जेतेपदाचा मान मिळवला, असं शरद पवार यांनी म्हटलंय.
Our @BCCIWomen cricket team lost the #INDvAUS #T20WorldCupFinal but #TeamIndia played exceptionally well to reach the finals. They have been performing to the best of their abilities and their future is very bright. Wishing them all the success!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 8, 2020
महत्वाच्या बातम्या –
विश्वचषक जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगलं!
वंचितला मोठा धक्का; माजी आमदारासह 44 पदाधिकारी करणार राष्ट्रवादीत प्रवेश?
राज ठाकरेंच्या भेटीनंतर मिलिंद एकबोटेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
आपला पॅटर्नच वेगळा; मुळशीत लग्न लागताच गाड्या फटाक्यासारख्या पेटल्या!