आता पराभव झाला असला तरी टीम इंडियाचे भविष्य उज्वल आहे-शरद पवार

मुंबई | अवघ्या जगाचं लक्ष्य लागून राहिलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकात भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 85 धावांनी मात करत पुन्हा एकदा विश्वचषक आपल्या नावावर केला आहे.

टीम इंडियाच्या पराभवानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केलं आहे.

भारतीय महिला संघाला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला असला तरी या स्पर्धेतील त्यांची कामगिरी अविश्वसनीय होती, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम खेळ केला आणि टीम इंडियाचे भविष्य उज्वल आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ऑस्ट्रेलियन महिला संघाचे अभिनंदन. मोक्याच्या सामन्यात त्यांनी त्यांची कामगिरी उंचावली आणि जेतेपदाचा मान मिळवला, असं शरद पवार यांनी म्हटलंय.