नवी दिल्ली | कोरोना थांबवणं आता तुमच्या हाती आहे असं म्हणत WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने भारताचं कौतुक केलं आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 499 वर पोहचली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून भारताने देशभरातल्या 548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन घोषित केलं आहे.
भारत कोरोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी उचलत असलेली पावलं कठोर असली तरीही योग्यच आहेत. या प्रकारची पावलं उचलणं भारताने सुरु ठेवलं पाहिजे असंही WHO ने सुचवलं आहे. WHO चे कार्यकारी संचालक मायकल जे रेयान यांनी भारताचं कौतुक केलं आहे.
चीनप्रमाणेच भारत हा देखील बहुसंख्य लोक असलेला देश आहे. या देशात कोरोनाचं जे संकट ओढवलं त्यानंतर आक्रमक निर्णय घेण्यात आले, असं मायकल जे रेयान यांनी म्हटलं आहे.
लोकांच्या आरोग्य जपण्याच्या आणि जीव वाचवण्याच्या दृष्टीने भारताने घेतलेले निर्णय योग्य आहेत. भारताने ज्या प्रमाणे देवी आणि पोलिओ या दोन रोगांशी लढा दिला तसाच लढा देण्याची भारताची वृत्ती आत्ताही दिसून येते आहे, असं मायकल जे रेयान म्हणाले.
India like China is hugely populated&future of #COVID19 to greater extent will be determined by what happens in densely populated large countries. It is really important that India continue to take aggressive action at public health level: WHO Executive Director Dr Michael J Ryan pic.twitter.com/djDgZxt2Zj
— ANI (@ANI) March 23, 2020
महत्वाच्या बातम्या-
-26 मार्चला होणारी राज्यसभेची निवडणूक आयोगाने पुढे ढकलली
-पंतप्रधान मोदी आज रात्री 8 वाजता पुन्हा संबोधित करणार; काय घोषणा करणार??
-कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिलं तीन महिन्यांचं वेतन
-महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याने कोरोनाविरोधातील लढाई जिंकली
-चिंताजनक | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार; पुण्यात आणखी 3 रुग्ण पॉझिटिव्ह